- सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. ग्रामपंचायतीस, तंटामुक्त गाव पुरस्कार, निर्मल ग्रामयोजना, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना व आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव तालुकास्तरीय पुरस्कार यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.
ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :
- ग्रामस्वच्छता अभियान
- वृक्षारोपण कार्यक्रम
- कृषी उपक्रम,
- कापडी पिशवी वाटप,
- गरीब विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप,
- स्वच्छता मोहिम इ.
- सरकारी गायरान मध्ये २५ हजार वृक्ष लागवड
- अंगणवाडी व शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल पाट्या वाटप.
- लोकसहभागातून ग्रामपंचायत कार्यालयात फरशी व रंगकाम करणे.
ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :
- तंटामुक्त गाव पुरस्कार
- हागणदारी मुक्त गाव पुरस्कार